skinhealsolutions@gmail.com

psoriasis and vitiligo

त्वचारोगाचे वाढते प्रमाण

Author: Dr. Neha Dongaonkar, Ayurvedic Skin & Beauty Specialist
Clinic: Skin Heal Solutions Pvt. Ltd.

काय हो डॉक्टर? आजकाल त्वचारोग फार जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात असे का माझ्याकडे पांढऱ्या डागावर उपचार घेणारी रुग्ण मला विचारीत होती. मी म्हटल, खरच, आजकाल त्वचारोगाचे प्रमाण खुपच वाढले. तेव्हा रुग्ण म्हणाली, “ तुम्ही म्हणताय त्यामुळे असेल पण पांढरे डाग (कोड) पण पुर्वीपेक्षा जास्तच बघायला मिळतोय.”

का? त्वचारोग एवढया प्रमाणात दिसतात आहे ऍलर्जीमुळे होणारा त्वचारोग पण पुर्वी कधी ऐकण्यास नव्हते पण आता खुपच दिसतोय. रुग्णाची जिज्ञासा. आपण पुर्वीचा आहार आठवला तर खुपच फरक सध्याच्या आणि पुर्वीच्या आहारात दिसुन येईल. फास्ट फुड, जंक फुड, चायनीज, भेळ, पाणीपुरी हयात गोड, आंबट,तिखट खारट असे (कटु रस सोडला तर) एकञच सेवन केल्या जातो. त्यावर थंड आईसक्रिम मटका कुल्फी हयासारखे पदार्थ खाउन जाठराग्नी प्रदीप्त न करता विझवण्याचे काम करतो. हयाशिवाय आहारानंतर निद्रा झोपेची कुठलीही एक वेळ नाही कधीही उठायचे कधी झोपायचे हयामुळे जसा निसर्गाचा समतोल बिघडतोच  तसाच शरीरातील दोषांचा समतोल बिघडतोच. हयाशिवाय प्रत्येकजण धाववपळ, तीव्र स्पर्धा हयासोबत जबरदस्त ताण घेउन पळतोय. अगदी शाळकरी मुलांपासुन ते मोठंयापर्यंत हयाची किंमत आपण शारीरिक व मानसिक व्याधीच्या रुपाने मोजतोय.

त्वचारोगामध्ये मानसिक तणाव हा सुध्दा महत्तवाचा घटक मानल्या जातो. काही विकार “सायको – सोमॅटिक” हया प्रकारात मोडतात. त्वचारोगाचे आणखी महत्तवाचे कारण सदोष आहार पध्दतीमुळे दिसणारी बध्दकोष्ठता, त्यामुळे त्वचारोग जीर्ण होतो पण बरा होत नाही. आरोग्य विभागात असे म्हटल्या जाते त्वचारोगाच्या “रुग्णाचा फाईलीचा गठठा वाढतच जातो पण रुग्णाचा आजार जिथल्या तिथेच असतो” ही कुचेष्ठा नाही सत्यच आहे.

पण आयुर्वेद चिकित्सा पध्दतीमध्ये असे होत नाही. दोषांचा बिघडलेला समतोल प्राकृतावस्थेमध्ये आणण्यासाठी उपचार केल्या जाउन बध्दकोष्ठता, अकार्यक्षम पचनशक्ती हयावर देखील उपचार करुन त्यानंतर  त्वचा रोगावरील आयुर्वेदातील औषधोपचार पध्दती वापरल्या जाते. त्यामुळे तो सोरायसिस असो,कोड असो की पिंपल्स असो हया सर्व आजाराचे कोउ सोडविल्या जाते.

त्वचारोग होउ नये हयासठी विरुध्दान अजिबात घेउ नये. दुध व फळे. दुध व मीठ, उडीद दाळ व दुध, जास्त खारवलेले पदार्थ्, लवणयुक्त आहार टाळा कोड असलेल्या रुग्णानी शक्य झाल्यास मिठाऐवजी सैधंव मीठ वापरावे, आंबट पदार्थ वर्ज्य करावे ऍलर्जीमुळे होणारा त्वचारोग हयामध्ये दोषांचा समतोल बिघडलेला असतो. त्यामुळे अंगावर बारीक पुरळ, खाज गाठी येणे, डोक्यात  खवडे, पुरळ, पुरळ लालसर फोड येणे हयासारखी ऍलर्जी होउन रुग्झ ‘स्त झालेला असतो. कधी त्वचारोग आपोआप कमी झाल्यासारखा वाटतो व अचानक वाढतो. त्यामुळे त्वचारोग अचानक वाढतो. त्यामुळे त त्वचारोग कायमचा बरा करण्यास आयूर्वेद उपचारपध्दती प्रभावी ठरते.

त्वचवारोग होउ नये म्हणून आहार सात्वीक असावा. गरम मसाल्याचे, आरमुक्त, तिखट पदार्थ टाळावे. आहारात तुपासारखे स्निग्ध पदार्थ असावे. त्यामुळे त्वचेला पोषण मिळून तकाकी येते. बध्दकोष्ठता टाळावी. रक्तातील उष्णता  वाढल्यास त्वचारोग होउ शकतो.  त्यासाठी आहारात थंड पदार्थ धने, जिरे, कोथिंबिर शेवा वापरावा. चौरस आहार असुन त्यांच्या वेळा नियंञित असाव्या. निद्रा फार महत्तवाची आहे. झोप चांगली झाल्यास त्वचा सतेज दिसते. मानसिक ताण तणावाल दुर ठेवावे. दिवसभरातुन स्वत:ला 1 तास देउन आत्मचिंतन करावे. त्यामुळे पण शरीर उत्तम राखल्या जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top